साडेनऊला अर्ध्या तासात येतो असं सांगून गेलेला तिचा नवरा आनंद,साडेबारा झाले तरी आला नाही त्यामुळे अस्वस्थ झालेली गौरी पुन्हा पुन्हा गॅलरीत जात होती.आनंद मोबाईल पण घरी विसरून गेला होता.असीमनी तर पप्पा कुठे गेलाय? कधी येणार?विचारून भंडावून सोडलं होतं.नुकत्याच बोलायला लागलेल्या छोटया अनन्याकडे बघून तिला वाटलं ह्या दोघांना घेऊन मी शोधायला तरी कुठे जाऊ? तिने आपल्या भावाला फोन लावला. "मी निघालोच आहे"एवढं बोलून दादानी फोन ठेवला गौरी अजुनच गोंधळली.ह्याला काय कळलय म्हणून हा इकडे यायला निघालाय.अनन्याला कडेवर घेऊन ती पुन्हा गॅलरीत गेली तर गेटवर तिला तिची आई आणि भाऊ येताना दिसले, आणि त्यांना सोसायटीतली काही मंडळी सामोरी गेली.दोघजण दादाला बाजूला घेऊन काही तरी बोलू लागले.गौरीच्या मनात आलं"काय चाललंय ह्यांच आणि ही आई कशाला आलीय इतक्या दुपारी! आणि हा दादा आईला कां घेऊन आलाय?एकतर आईला कमरेच्या त्रासामुळे चालवत नाही! तिला काहीतरी वाईट घडल्याची चाहूल लागली.
सर्वजण वरती आले.इतकीजण अचानक घरांत आल्यामुळे गौरीपण थोडीशी भांबावली."काकू,कस सांगू कळत नाहीय! आनंदकाकाचा अपघात झालाय."शेजारचा मंदार चाचरत म्हणाला."कुठे? कधी?" गौरी अक्षरशः थरथरत होती.तो कुठे आहे?मला घेऊन चल त्याच्याकडे!तिची आई तिच्या जवळ आली आणि हमसाहमसी रडू लागली.दादानी तिच्याकडे बघत नाही अशी मान हलवली."अरे दादा तू नाही काय म्हणतोस! गौरी अनावर झाली होती .कोणालाहि न जुमानता तिने मंदारचा हात धरून मला घेऊन चल असं म्हणत त्याला दरवाजाकडे ओढून नेऊ लागली."गौरी शांत हो, अघटीत घडलंय पण आनंद आता आपल्याला सोडून गेलाय हे खर आहे. अपघात झाला तेव्हा मंदार तिथेच होता त्यामुळे लगेच कळलं! दादा बोलत होता पण गौरीला काही कळत नव्हतं.अत्यंत बधिर मनाने आणि यांत्रिकपणे रात्रीपर्यंत सर्व आटपले.काळ कोणासाठी थांबत नाही हेच खरं!
"तो"नसताना पण पहाट झाली होती.गौरीनी उठून घरभर नजर फिरवली.आनंदचा मोठा भाऊ- वहिनी बाहेर सोफ्यावर बसले होते. तिला बघून दोघेही उठून जवळ आले.दादा मुलांबरोबर आत झोपला होता.तिची चाहूल लागल्यावर तोही उठून आला.मुलांना बघून तिला भडभडून आलं."गौरी ड्रायव्हिंग शिक,गौरी तुझा फॅशन डिझायनिंगचा बिझनेस वाढव,गौरी कम्पुटर शिक.सतत आपल्याला प्रोत्साहन देणारा, उमदा सिव्हील इंजिनिअर असलेला,आपला नवरा असा कसा काहीच न बोलता आपल्याला एकट करून गेला.आपल्याला त्यावेळी कटकट वाटायची.तिला वाटल आयुष्य रिव्हाईंड कराव आणि त्याला सांगाव सगळ तू सांगशील ते करेन पण सोडून नको जाऊस!खूप हिंमत करून एकवटलेला तिचा धीर पुन्हा एकदा सुटला.ती ओक्साबोक्शी रडू लागली.दादांनी सर्वांना हातानी 'रडू दे तिला' अशी खूण केली.
इतक्यात समोरच्या घरातल्या नर्मदाभाभी चहा घेऊन आल्या.गौरीला रडताना बघून त्यांनी तिला जवळ घेतले.त्यांच्या आश्र्वासित स्पर्शानी गौरी शांत झाली."अनन्याची काळजी नका करू! मी आहे"भाभीनी हळूच गौरीच्या कानात सांगितलं!गौरीला पण माहीत होतं अनन्याला भाभींचा किती लळा आहे.
पुढचे तेरा दिवस आनंदनी जोडलेली माणसं, नातेवाईक ह्यांच्या येण्याजाण्यात कुठे गेले कळलच नाही.दादा ,भावजीआणि जाऊबाई सावलीसारखे तिच्या बरोबर होते.गौरीला वाटलं'भावाबहिणीच नातं जपणा-या आपल्याला गेल्या तेरा दिवसात दादा किती नव्यानी कळला.वहिनी जेव्हा अचानक म्हणाली"गौरीताई आईंना पाहिजे तर तुमच्या कडे ठेवून घ्या.तेवढीच तुम्हाला मदत!त्यावर दादा लगेच म्हणाला"अरे तू तर रोज मला म्हणतेस तुमच्या आईच मलाच करावं लागतं काही मदत होत नाही आणि हिला कशी मदत होईल?वहिनीला परस्पर उत्तर दिल्यामुळे गौरीला दादाच कौतुक वाटलं.तिला आता ह्या परिस्थितीत नव्यानी स्वत:ला उभं करायच होत आणि त्यामुळे तिला आता खरंच कोणी नको होत.
तुझी असुनही तूं नाही अन्
मी असुनी मज अनोळखी! अशी कवितेतल्या ओळींसारखी तिची अवस्था होती.
संध्याकाळी सर्वजण जायला निघाले.तेव्हा भाभी पण आल्या.दादाला म्हणाल्या"काळजी नका करू, थोडे दिवस मी इथेच झोपणार आहे.दादानी त्यांच्या कडे बघून हात जोडले.तुमचा खूप आधार वाटतो आम्हाला!
सर्वजण गेल्यावर गौरीनी असीमला जवळ घेतलं "किती दिवसांनी भेटलास बेटा, तुला माहितीये आपले पप्पा तर देवाच्या घरी गेलेत कधीच परत न येण्यासाठी आणि आपली अनन्या तर खूपच छोटी आहे.तेव्हा आपल्या दोघांनाच तिला सांभाळायचय! करशील ना मला मदत? वागशील ना शहाण्यासारखा? गौरीला भरून आलं.असीमनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला"प्राॅमिस मम्मा,मी एकटासुध्दा घरी राहीन! मी आता बिग बॉय झालोय.फक्त रडू नकोस मग मला पण रडायला येतं.गौरीला जाणवलं की असीम साठी आपण खंबीर असलच पाहिजे.भाभी सर्व ऐकत होत्या.त्यांनी गौरीकडे बघितलं आणि तिच्या मनातलं समजल्या सारख म्हणाल्या"तुला कठीण व्हायलाच पाहिजे.नाहीतर असीम ढीला पडेल.गुजराथी असलेल्या भाभी विचारांनी खूप पुढारलेल्या होत्या.मी पण तुला एक गोष्ट सांगते तू तुझा ड्रेस बनवायचा काम सुरू कर.अनन्याची काळजी नको करू मी सांभाळेन तिला.मला घरांत काम कमीच असतं माझा पण वेळ जाईल. आणि त्याबदल्यात माझ्या नवीन सुनेला तुझ काम शिकव.तीची तुला मदतच होईल.गुजराथी आहे आम्ही,"इस हात दे इस हात ले"बरेच दिवसांनी वातावरण थोड हलक झाल होत.
गौरीला भाभींची आॅफर ऐकून खूप बरं वाटल! तिला आनंदची आठवण झाली.मागे लागून त्यानी ड्रेस डिझाईनींगच काम सुरू ठेवायला लावले होते.नाहीतर असीम नंतर दहा वर्षांनी अनन्याच्या वेळी दिवस गेले तेव्हा तो व्यवसाय ती बंदच करणार होती."भाभी दादाशी, आनंदच्या भावाशी बोलते आणि मग एकत्र बसून ठरवूया.तुमच्या यजमांनाशी पण मला बोलायला लागेल! अरे गौरीबेन त्यांच्याशी बोलल्याशिवाय मी तुझ्याशी कशी बोलेन?ते तर पहिले असणार आपण बोलणार तेव्हा!
गौरीला वाटलं ही आनंदचीच ईच्छा असणार.कारण रडणारी, केविलवाणी गौरी त्याला आवडलीच नसती."तो"नसताना ती आलेल्या परिस्थितीतून धैर्याने मार्ग काढणार.आणि दोन्ही मुलांना वाढवताना त्यांच्याकडे जग अभिमानाने पाहिल असच ध्येय ठेवून वागणार.दोन्ही मुलांना जवळ घेऊन गौरीनी आनंदच्या फोटोकडे समजल्या सारख बघितलं.
-Lalita Chheda
सर्वजण वरती आले.इतकीजण अचानक घरांत आल्यामुळे गौरीपण थोडीशी भांबावली."काकू,कस सांगू कळत नाहीय! आनंदकाकाचा अपघात झालाय."शेजारचा मंदार चाचरत म्हणाला."कुठे? कधी?" गौरी अक्षरशः थरथरत होती.तो कुठे आहे?मला घेऊन चल त्याच्याकडे!तिची आई तिच्या जवळ आली आणि हमसाहमसी रडू लागली.दादानी तिच्याकडे बघत नाही अशी मान हलवली."अरे दादा तू नाही काय म्हणतोस! गौरी अनावर झाली होती .कोणालाहि न जुमानता तिने मंदारचा हात धरून मला घेऊन चल असं म्हणत त्याला दरवाजाकडे ओढून नेऊ लागली."गौरी शांत हो, अघटीत घडलंय पण आनंद आता आपल्याला सोडून गेलाय हे खर आहे. अपघात झाला तेव्हा मंदार तिथेच होता त्यामुळे लगेच कळलं! दादा बोलत होता पण गौरीला काही कळत नव्हतं.अत्यंत बधिर मनाने आणि यांत्रिकपणे रात्रीपर्यंत सर्व आटपले.काळ कोणासाठी थांबत नाही हेच खरं!
"तो"नसताना पण पहाट झाली होती.गौरीनी उठून घरभर नजर फिरवली.आनंदचा मोठा भाऊ- वहिनी बाहेर सोफ्यावर बसले होते. तिला बघून दोघेही उठून जवळ आले.दादा मुलांबरोबर आत झोपला होता.तिची चाहूल लागल्यावर तोही उठून आला.मुलांना बघून तिला भडभडून आलं."गौरी ड्रायव्हिंग शिक,गौरी तुझा फॅशन डिझायनिंगचा बिझनेस वाढव,गौरी कम्पुटर शिक.सतत आपल्याला प्रोत्साहन देणारा, उमदा सिव्हील इंजिनिअर असलेला,आपला नवरा असा कसा काहीच न बोलता आपल्याला एकट करून गेला.आपल्याला त्यावेळी कटकट वाटायची.तिला वाटल आयुष्य रिव्हाईंड कराव आणि त्याला सांगाव सगळ तू सांगशील ते करेन पण सोडून नको जाऊस!खूप हिंमत करून एकवटलेला तिचा धीर पुन्हा एकदा सुटला.ती ओक्साबोक्शी रडू लागली.दादांनी सर्वांना हातानी 'रडू दे तिला' अशी खूण केली.
इतक्यात समोरच्या घरातल्या नर्मदाभाभी चहा घेऊन आल्या.गौरीला रडताना बघून त्यांनी तिला जवळ घेतले.त्यांच्या आश्र्वासित स्पर्शानी गौरी शांत झाली."अनन्याची काळजी नका करू! मी आहे"भाभीनी हळूच गौरीच्या कानात सांगितलं!गौरीला पण माहीत होतं अनन्याला भाभींचा किती लळा आहे.
पुढचे तेरा दिवस आनंदनी जोडलेली माणसं, नातेवाईक ह्यांच्या येण्याजाण्यात कुठे गेले कळलच नाही.दादा ,भावजीआणि जाऊबाई सावलीसारखे तिच्या बरोबर होते.गौरीला वाटलं'भावाबहिणीच नातं जपणा-या आपल्याला गेल्या तेरा दिवसात दादा किती नव्यानी कळला.वहिनी जेव्हा अचानक म्हणाली"गौरीताई आईंना पाहिजे तर तुमच्या कडे ठेवून घ्या.तेवढीच तुम्हाला मदत!त्यावर दादा लगेच म्हणाला"अरे तू तर रोज मला म्हणतेस तुमच्या आईच मलाच करावं लागतं काही मदत होत नाही आणि हिला कशी मदत होईल?वहिनीला परस्पर उत्तर दिल्यामुळे गौरीला दादाच कौतुक वाटलं.तिला आता ह्या परिस्थितीत नव्यानी स्वत:ला उभं करायच होत आणि त्यामुळे तिला आता खरंच कोणी नको होत.
तुझी असुनही तूं नाही अन्
मी असुनी मज अनोळखी! अशी कवितेतल्या ओळींसारखी तिची अवस्था होती.
संध्याकाळी सर्वजण जायला निघाले.तेव्हा भाभी पण आल्या.दादाला म्हणाल्या"काळजी नका करू, थोडे दिवस मी इथेच झोपणार आहे.दादानी त्यांच्या कडे बघून हात जोडले.तुमचा खूप आधार वाटतो आम्हाला!
सर्वजण गेल्यावर गौरीनी असीमला जवळ घेतलं "किती दिवसांनी भेटलास बेटा, तुला माहितीये आपले पप्पा तर देवाच्या घरी गेलेत कधीच परत न येण्यासाठी आणि आपली अनन्या तर खूपच छोटी आहे.तेव्हा आपल्या दोघांनाच तिला सांभाळायचय! करशील ना मला मदत? वागशील ना शहाण्यासारखा? गौरीला भरून आलं.असीमनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला"प्राॅमिस मम्मा,मी एकटासुध्दा घरी राहीन! मी आता बिग बॉय झालोय.फक्त रडू नकोस मग मला पण रडायला येतं.गौरीला जाणवलं की असीम साठी आपण खंबीर असलच पाहिजे.भाभी सर्व ऐकत होत्या.त्यांनी गौरीकडे बघितलं आणि तिच्या मनातलं समजल्या सारख म्हणाल्या"तुला कठीण व्हायलाच पाहिजे.नाहीतर असीम ढीला पडेल.गुजराथी असलेल्या भाभी विचारांनी खूप पुढारलेल्या होत्या.मी पण तुला एक गोष्ट सांगते तू तुझा ड्रेस बनवायचा काम सुरू कर.अनन्याची काळजी नको करू मी सांभाळेन तिला.मला घरांत काम कमीच असतं माझा पण वेळ जाईल. आणि त्याबदल्यात माझ्या नवीन सुनेला तुझ काम शिकव.तीची तुला मदतच होईल.गुजराथी आहे आम्ही,"इस हात दे इस हात ले"बरेच दिवसांनी वातावरण थोड हलक झाल होत.
गौरीला भाभींची आॅफर ऐकून खूप बरं वाटल! तिला आनंदची आठवण झाली.मागे लागून त्यानी ड्रेस डिझाईनींगच काम सुरू ठेवायला लावले होते.नाहीतर असीम नंतर दहा वर्षांनी अनन्याच्या वेळी दिवस गेले तेव्हा तो व्यवसाय ती बंदच करणार होती."भाभी दादाशी, आनंदच्या भावाशी बोलते आणि मग एकत्र बसून ठरवूया.तुमच्या यजमांनाशी पण मला बोलायला लागेल! अरे गौरीबेन त्यांच्याशी बोलल्याशिवाय मी तुझ्याशी कशी बोलेन?ते तर पहिले असणार आपण बोलणार तेव्हा!
गौरीला वाटलं ही आनंदचीच ईच्छा असणार.कारण रडणारी, केविलवाणी गौरी त्याला आवडलीच नसती."तो"नसताना ती आलेल्या परिस्थितीतून धैर्याने मार्ग काढणार.आणि दोन्ही मुलांना वाढवताना त्यांच्याकडे जग अभिमानाने पाहिल असच ध्येय ठेवून वागणार.दोन्ही मुलांना जवळ घेऊन गौरीनी आनंदच्या फोटोकडे समजल्या सारख बघितलं.
-Lalita Chheda
No comments:
Post a Comment